मुंबई : पालघर मध्ये भाजपला दोन मतं पडायची तेंव्हा आमच्या वडिलांनी परीश्रम घेऊन पालघरमध्ये पक्ष वाढवला असं स्पष्ट करताना भाजप नेत्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं असा आरोप केला तसेच भाजपच्या नेत्यांना आमच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी जराही वेळ नाही हे पाहून अखेर आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे म्हटले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेण्याआधी वनगा कुटुंबीयांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. नंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आमच्या वडिलांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली, पण आम्हाला मुख्यमंत्री फडणवीसांनी भेट दिली नाही. त्यामुळे आम्ही भाजप पक्ष सोडत आहोत असं वणगा कुटुंबाने जाहीर केलं आणि शिवसेनेत प्रवेश केला.
