28 March 2023 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

RBI आणि केंद्रातील वाद विकोपाला? आकस्मिक योजनेसाठी साऊथ ब्लॉकची तयारी?

नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रातील मोदी सरकारमधील वाद विकोपाला गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आरबीआयच्या संचालक मंडळाच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या मुंबईतील बैठकीत उर्जित पटेल यांनी काही आकस्मित निर्णय घेतल्यास साऊथ ब्लॉकने तयारी सुरु केली असून त्यांच्याजागी हसमुख अधिया यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, RBI च्या संचालक मंडळाची १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असल्याचे कारण पुढे करत उर्जित पटेल यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले आहे. RBI ला मिळालेल्या ३ लाख कोटींच्या लाभांशामध्ये मोदी सरकारला सरकारला सहभागी करून घेण्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संघर्षाची ठिणगी उडाली आहे.

सर्व साधारणपणे RBI कडून केंद्राला प्रतिवर्षी २५,००० ते ३०,००० कोटींचा लाभांश दिला जातो. परंतु, मोदी सरकारने यावर्षी खूप मोठी रक्कम मागितल्यामुळे वाद अधिकच पेटला आहे. कारण याआधी इतिहासात कोणत्याही सरकारने एवढी प्रचंड मोठी रक्कम मागितली नव्हती. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका सध्या वित्तीय तूट वाढल्याने डबघाईस आल्या असून अर्थमंत्रालयाला नव्याने भांडवल उभारणीसाठी ही रक्कम हवी आहे. तसेच बँकांना तारण्यासाठी मोदी सरकारने यापूर्वीच २ लाख कोटींची तरतूद केली आहे. परंतु, असे असले तरी मोदी सरकारला बिगर वित्तीय संस्था, पायाभूत क्षेत्र तसेच बँकांचे पुनर्भांडवल याकरीता मोठा निधी गरजेचा आहे.

RBI च्या स्वायत्ततेच्या मुद्यावर तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत. त्यात RBI संचालक मंडळाचे अधिकृत पूर्णवेळ सदस्य नसलेल्यांपैकी एस. गुरुमूर्ती यांनी RBI वर आणि केंद्रीय अर्थसचिव सुभाष गर्ग यांनी RBI डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांना टीकेचे लक्ष्य केल्यामुळे शाब्दिक चकमक पुढे सुद्धा वाढू शकते असं म्हटलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x