25 April 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पालघरच्या मूळ समस्या प्रचारातून बाजूला ?

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्थानिक मूळ विषयांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तीरांजली दिली असून प्रचाराचा सर्व रोख हा वैयक्तिक टीकेवर केंद्रित झाल्याचे चित्र आहे. नालासोपारा, वसई, विरार, बोईसर ते पालघर पट्यातील लोकांच्या मूळ समस्या ह्या प्रचारातून गायब झाल्या असून एकमेकांवर चिखलफ़ेक करण्यातच सर्व पक्ष गुंतले आहेत.

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यू पश्चात होणारी ही पोटनिवडणूक केवळ व्यक्तिगत आरोप आणि प्रत्यारोप करण्यात खर्ची पडत आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे हयात असताना सुद्धा जेवढं राजकारण झालं नसेल, त्यापेक्षा कित्येक पटीने किळसवाणं राजकारण सध्या त्यांच्या मृत्यू पश्च्यात पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना पक्षाचे नेते एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यात व्यस्त आहेत. विकासाचा आणि स्थानिक मूलभूत प्रश्नांचा सर्वच नेत्यांना विसर पडल्याचे चित्र आहे.

त्यामुळे टीका करताना वाघ कुत्र्यांच्या उपमा एकमेकांना भर सभेत दिल्या जात आहेत. एकूणच अशा प्रकारच्या टीका पाहिल्यावर भविष्यात निवडून येणारा पक्ष हा विकास या मुद्यावर पालघर जिल्ह्याला काय देणार हे आत्ताच अधोरेखित होत आहे. एकूणच पालघर पोटनिवडणूक ही एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचं माध्यम झाल्याचं चित्र आहे. सर्वच पक्षांच्या प्रचारातील मुद्यांचा कानोसा घेतल्यास भविष्यात तरी पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि मूळ समस्यांमध्ये काही बदल होईल का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x