मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर वाहू लागले आहेत आणि मोदी सरकार रोजगाराच्या मोठ्या मोठ्या घोषणा करत असलं तरी अनेक तरुण असलेला रोजगार सुद्धा गमावत आहेत असं चित्र आहे. कारण महाराष्ट्रातील मुळशी, मावळ, भिरा, खोपोली मधील तब्बल २५० गावांमधील सुमारे १५०० कर्मचाऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत.

उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजताची वेळ दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांचे नेते शिवाजी भागवत यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात काल आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘राज्यातील ३ धरणांसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना संबंधित प्रकल्पावर कंत्राटी स्वरूपात कामावर सामावून घेण्यात आले होते.

परंतु, १९९४ साली कंत्राटी पद्धतीने नवीन कामगार भरती करून या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. दरम्यान, बेरोजगार करण्यात आलेल्या कामगारांच्या पुनर्वसनासाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यावेळी संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचं यावेळी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं. परंतु, कंपनीच्या व्यवस्थापनाणे आमची फसवणूक केल्याच यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान, सदर विषयावर राज ठाकरे यांच्या मध्यस्तीतून काही तोडगा निघतो का यासाठी राज ठाकरे यांची भेट घेऊन अडचणी मांडणार असणार असल्याचं यावेळी प्रसार माध्यमांना सांगितलं.

ex unemployed employees of tata power project will meet raj thackeray tomorrow at krushnakunj