रत्नागिरी : राज्यात बाळासाहेबांच्या नैत्रुत्वात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना आज केवळ मराठी माणसाच्याच विरोधात काम करत आहे. त्यात व्यवसाय करण्यासाठी पुढे येणा-या मराठी तरूणांच्या आड येण्याचे कारनामे सुद्धा सध्या शिवसेनेवाले करत आहेत. मग अशावेळी मराठी माणसांनी मूग गिळून गप्प बसायचे का? अशावेळी मराठी तरूण-तरुणींनी रोजगार कोणाकडे मागायचा? यापुढे आम्ही असे अजिबात होऊ देणार नाही असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.
पुढे उपस्थित तरुणांना संबोधित करताना निलेश राणे म्हणाले की, मराठी तरूणांचे उद्योगधंदे नक्कीच वाढले पाहिजे. माझा मराठी तरूण हा आता उद्योगपती झाला पाहिजे आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न राहणार असून, आम्ही माराही तरूणांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थितांसमोर केले.
आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या युवक कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सध्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपूर्ण कोकणात लोकसभेसाठी जोमाने कामाला लागला असून, मोठ्या प्रमाणावर छोटेखानी सभांचे आयोजन करण्यात येत आहेत.
रत्नागिरी पावस जिल्हा परिषद गट (पूर्णगड) येथील पक्ष प्रवेश मेळाव्यात शिवसेना,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला. pic.twitter.com/v47eUNiejL
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 30, 2019
