27 July 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Lakhimpur Kheri Violence | प्रत्येक भागात भाजपचे हजार कार्यकर्ते उभे करा, शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते | हरियाणा भाजपचे मुख्यमंत्री

Lakhimpur Kheri Violence

चंदीगड, ०४ ऑक्टोबर | उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने (Lakhimpur Kheri Violence) आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज सकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव देखील घटनास्थळी पोहोचणार आहे.

Lakhimpur Kheri Violence. Manoharlal Khattar made an offensive statement that farmers know the language of the stick, answer as it is :

लखीमपूर खीरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अनेक योजनांचे उद्घाटन केले. त्यानंतर ते केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या बनवीरपूर गावाकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या हेलीपॅडवर कब्जा करून कृषी कायद्यांचा विरोध नोंदवला. यावेळी केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र हा काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोन गाडीतून तिकोनिया येथील बनबीरपूर पासून वेगात गेले. दरम्यान याचवेळी यातील भाजपा कार्यकर्त्यांची गाडी शेतकऱ्यांमध्ये शिरली आणि यात अनेत शेतकरी जखमी झाले. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतील चालकाला लोकांनी ठार केले आहे.

दुसरीकडे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली असून, यावरून विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केले.

चंदीगड येथे एका कार्यक्रमात बोलताना मनोहर लाल खट्टर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानानंतर विरोधकांनी आक्षेप नोंदवत खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. तर संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मनोहर लाल खट्टर म्हणाले की, प्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असे खट्टर यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Violence many Farmers Dead after BJP workers attacked.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x