मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून सलग सहा दिवस अधिवेशन चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विशेष महत्व आहे. मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी सांगितले होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे १ मार्चला चर्चा होईल आणि २ तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून त्या चर्चेचे उत्तर दिले जाईल. अधिवेशनानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे ७ दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चा व दुष्काळावरील चर्चेच्या निमित्ताने सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.

maharashtra state legislature budget session begins today