चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून देशातील सामान्य जनतेला फसवत आहेत, परंतु लोक हे आता खपवून घेणार नाहीत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे के कोंकण दौऱ्यावर असून ते रत्नागिरी दाखल झाले असून त्यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत असून त्यांनी आता साफ नीयत-सही विकास हा नवा नारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी हा दिवस म्हणजे ‘विश्वासघात दिन’ म्हणून पाळणार आहेत. राज ठाकरे कोंकण दौऱ्यावर असून ते कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या तसेच स्थानिक कोंकणी लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत.
याच दौऱ्यात अनेक पत्रकार त्यांना मोदी सरकारच्या कारभारा विषयी प्रश्न विचारात आहेत. आज मोदीसरकारला ४ वर्ष पूर्ण होत असल्याने पत्रकांनी त्यांना मोदी सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न केलं तेव्हा, ‘देशातील हुकूमशाही ७-८ महिन्यांत संपेल’ असं उत्तर दिल आहे. मोदींनी सामान्य जनतेला फसवलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता हे सर्व खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले.
