30 April 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात काहीच गैर नाही: शरद पवार

Sharad Pawar, NCP, Shivsena, Maharashtra Vidhansabha Election 2019

बारामती: ‘भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईलआणि उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. “१९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही,” असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सत्तेत सहभागी होण्यासाठी तरुण पिढीचा पाठिंबा नक्की आहे. मात्र, खुर्ची धरण्यासाठी टीम उभी करावी लागते. आमच्या डोक्यावरील जबाबदारीचे ओझे वाढले असून, भविष्यात तिची पूर्तता करणे कर्तव्य आहे आणि आम्ही ते अखंडपणाने करू,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

चारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीमधून नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यावरुन केलेली टीका योग्य नव्हती असं पवारांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीकाही चुकीची होती असंही पवार म्हणाले. “मुख्यमंत्री हे प्रगल्भ नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली वक्तव्य चुकीची होती. मला पद्मविभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. जर माझ्यामध्ये एवढ्या कमतरता असतील तर मला पुरस्कार का देण्यात आला?” असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

शिवसेनेची साथ सोडणं भाजपाला महागात पडेल असं शरद पवार म्हणाले आहेत. जनतेनं आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. सेना भाजपाची युती आधीच ठरली आहे त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेणार नाही अशी प्रतिक्रीया शरद पवारांनी झी २४तासशी बोलताना दिली. इव्हीएम घोटाळ्याबाबत बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x