मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाला सर्व राज्यांमध्ये अपयश आल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध होत असलेल्या निकालांनंतर भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
दरम्यान, कालच आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, आता मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. त्यानंतर आज आलेल्या ५ राज्यातील निकालानंतर एकूणच मोदी सरकारविरोधात वातावरण गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
