2 May 2025 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

निसर्ग संपन्न केरळात जे शक्य झालं, ते कोकणात अनेक वर्ष का शक्य झालं नाही? राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी कोकणातील अनेक गंभीर विषयांना हात घातला. त्यावेळी त्यांनी कोकणच्या निसर्गाचा दाखला देताना केरळ राज्यातील पर्यटनाच उदाहरण समोर ठेवलं. जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीस लागलं, मग कोकणच्या निसर्गात अशी काय कमी होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केरळ राज्य जितकं निसर्ग संपन्न आहे तेवढीच कोकण भूमी सुद्धा निसर्ग संपन्न असून इथे त्यांच्या इतके पर्यटन का वाढीस आलं नाही. कारण कोकणाबद्दल तसा विचारच करण्यात आला नाही आणि त्यामुळेच केरळात जे शक्य झालं ते कोकणात आजही शक्य झालं नाही. अॅमेझॉननंतर कोकणच्या सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. त्यामुळे त्याच महत्त्व सामाजिक संस्थांनाही कळू लागल्याने, त्यांनी या संदर्भात सखोल अभ्यास सुरु केला आहे. पण दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे असा घणाघात सुद्धा राज ठाकरे यांनी केला.

केवळ निसर्गाला विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे विद्यमान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतियांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी कृपया देऊ नका, कारण तुमच्या जमिनी तुम्ही त्यांना विकल्या तर तुमची ओळखच कायमची पुसली जाईल. त्यामुळे कोकणी माणसाने सावध राहायला हवं, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

मनसे अध्यक्षांनी मेळाव्याचे भाषण सुरू करण्यापूर्वी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आणि कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या