मोदी सरकारकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारीच नाही: केंद्रीय कृषीमंत्र्यांची कबुली
![](https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/farmer-suicides-no-data-on-since-2016-agriculture-minister-informs-lok-sabhanew-maharashtranama.jpg?v=0.941)
नवी दिल्ली : सरकार बदललं तरी देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सजून तशाच कायम आहेत. काही दिवसांपासून देशभर विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनं पुकारली आणि थेट दिल्लीवर मोर्चे निघाले होते. देशभर शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर असताना मोदी सरकारमधील कृषिमंत्र्यांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे.
मोदी नेहमीच भाषणात शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा करत असतात. मात्र केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात लोकसभेत दिलेल्या माहितीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आहे. कारण, मागील ३ वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची कोणतीही माहिती मोदी सरकारकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी थेट लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात काबुल केलं आहे. २०१६ नंतर म्हणजे मागील ३ वर्ष ही आकडेवारी उपलब्ध नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना कृषिमंत्र्यांनी ही माहिती सभागृहाला दिली.
लोकसभेत उत्तर देताना सिंह म्हणाले, National Crime Records Bureau अर्थात ‘NCRB’ ही संस्था शेतकरी आत्महत्येसंदर्भात देशभरातून माहिती गोळा करत असते. परंतु, या संस्थेने २०१५ नंतर आत्महत्येची कोणतीही आकडेवारीच जाहीर केलेली नाही. NCRB ही संस्था राजनाथ सिंग यांच्याकडे असलेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येते. सरकारकडे मागील ३ वर्षातली आकडेवारीच नसेल तर पीडितांच पुनर्वसन कसं करणार असा सवाल त्रिवेदी यावेळी उपस्थित केला आहे.
२०१५ मधील आकडेवाडीनुसार NCRB च्या वर्षभरात ८,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती. यात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. २०१५ मध्ये महाराष्ट्र ३०३०, तेलंगणा १३५८, कर्नाटक ११९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या असा तो अहवाल होता. तर ४,५०० शेतमजुरांनी आत्महत्या केल्याची माहिती सुद्धा त्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची इतकी भयानक स्थिती असताना दरवर्षी ही आकडेवारी प्रसिद्ध व्हायला पाहिजे, अशी थेट मागणी विरोधकांनी लोकसभेत उचलून धरली.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट
-
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
-
Credit Card Application | होय! इन्कम-प्रूफ नसेल तरी मिळेल क्रेडिट कार्ड, हे आहेत सोपे आणि सुरक्षित पर्याय
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या
-
Home Loan Alert | नोकरदारांनो! वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा...
-
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 5 वर्षांत दिला 4000% परतावा
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढ होणार, आकडेवारीबद्दल अपडेट आली
-
ITR Filing | पगारदारांनो! ITR डेडलाईन चुकल्यास केवळ दंडच नव्हे, तर 'हे' 5 नुकसान देखील होणार
-
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'व्या वेतन आयोगाची घोषणा होणार, वेतन-पेन्शन-भत्त्यांमध्ये वाढ
-
Tanla Share Price | मल्टिबॅगर तानला शेअरबाबत फायद्याची अपडेट, खरेदीला गर्दी, 2 दिवसात 15% परतावा दिला