मुंबई : काल रात्री कमला मिल येथे घडलेल्या अग्निकांडानंतर पाहणीसाठी आलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वच अवाक झाले आहेत. ते म्हणाले कि मी दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणाला भेट दिली होती आणि त्यावेळी मी येथे आग लागण्याची भीती व्यक्तं केली होती.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता वेगळेच प्रश्न माध्यमांमध्ये चर्चेला आले आहेत. जर आदित्य ठाकरे यांनी अशी भीती व्यक्त केली होती तर त्यांच्याच हातात असलेल्या महापालिकेने तत्परतेने कारवाई का नाही केली. नुकतीच महाबळेश्वर येथील डीजे च्या आवाजानं ठाकरें कुटुंबियांना त्रास झाल्यावर, मातोश्रीच्या आदेशाने पर्यावरण खात्याने हॉटेल बंद करण्याचा भीम पराक्रम ताजा असतानाच आदित्य ठाकरेंनाच आता प्रश्न केला जाऊ लागला आहे.
त्यांच्याच या प्रतिक्रियेतून जन माणसातून उलट सुलट प्रतिक्रिया यायला सुरवात झाली असून, त्यामुळे शिवसेनेची अजूनच पंचायत झाली आहे.
