2 May 2025 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
x

मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत: खासदार कीर्तीकर

नागपूर : पंतप्रधान मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदींच नाव घेऊन केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते हे शिवसेनेचे नेते सुद्धा उघड बोलू लागले आहेत.

शिवसेना केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये सहभागी असली तरी केंद्रात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नेहमी दुय्यम स्थान देतात असं म्हटलं आहे. सध्या आम्ही भाजप सोबत असलो तरी भविष्यात मात्र शिवसेना हा अपमान कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार तसेच पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मांडली.

खासदार गजानन कीर्तिकर सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक तसेच मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीतील वास्तव आणि भावना कार्यकर्त्यापुढे मांडत असताना हा खुलासा केला. सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खासदार गजानन कीर्तीकर विदर्भातील अनेक मतदारसंघांना भेट देणार आहेत.

पुढे मेळाव्यादरम्यान त्यांनी सांगितलं की, मोदींच्या या एककल्ली कारभाराचा केवळ शिवसेनेलाच नव्हे तर अकाली दल, टीडीपी या सरकारमधील प्रादेशिक पक्षांनाही आला आणि म्हणूनच टीडीपी अखेर सरकार बाहेर पडले. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक सहन होत नसल्यानेच प्रादेशिक पक्ष भाजपपासून वेगळे होत आहेत. त्यामुळे आगामी २०१९ ची निवडणूक भाजपसाठी फार कठीण असल्याचं मत व्यक्त करताना आता मोदी लाट केव्हाच संपली आहे असं विधान केलं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या