नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी सरकारविरोधात टीडीपी’ने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील लढाई मोदी यांनी शुक्रवारी आणि अपेक्षेप्रमाणे सहज जिंकली आहे. मतदानाच्या आकडेवारीनुसार विरोधकांच्या बाजूने १२६ मतं तर सरकारच्या बाजूने एकूण ३२५ मतं पडली आहेत.
तब्बल १० तास रंगलेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजीने तुंबळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना, भाजप आणि आरएसएस वर टीकेची झोड उठवली आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नसल्याचं दाखवून दिल. त्यामुळे नरेंद्र मोदी काँग्रेसच्या या खेळीला कस उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील होत.
त्यानंतर नरेंद्र मोदींनी दीड तास विरोधकांना प्रतिउत्तर देत आरोपांना प्रतिआवाहन दिल. सभागृहात त्यावेळी एकूण ५४३ सदस्यांपैकी ५४१ सदस्यच उपस्थित होते. शिवसेना, बीजेडी, टि.आर.एस या पक्षांचे खासदार मतदानास उपस्थित नव्हते. पंतप्रधानांच्या उत्तरानंतर अविश्वास प्रस्ताव मतास टाकण्यात आला असता, विरोधकांच्या बाजूने १२६ मतं तर सरकारच्या बाजूने ३२५ मते पडली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज आता सोमवारी सुरू होईल.
