नागपूर : काही महिन्यापासून वन नेशन वन ईलेक्शन’वर चर्चा रंगली असताना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे करायचे झाल्यास आधी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल तसेच ईव्हीएम’च्या दुप्पट म्हणजे तब्बल ४५ लाख मतदान यंत्र लागतील असं सांगत ‘एक देश, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं कारण दिल आहे.
ओमप्रकाश रावत हे एका कार्यक्रमानिमित्त नागपूरला आले असताना मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सद्यस्थितीत निवडणूक आयोगाला १५-१६ लाख यंत्र लागतात. परंतु आगामी निवडणुकीसाठी ४५ लाख यंत्र लागतील असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्राची ऑर्डर देण्यात दिली आहे. निवडणूक आयोगाकडे ते सप्टेंबर अखेरपर्यंत मतदान यंत्रे येतील तर नोव्हेंबरपर्यंत व्हीव्हीपॅट तयार होतील अशी माहिती दिली.
ईव्हीएमच्या विरोधात देशभरातील १७ पक्ष एकत्र आले आहेत,याकडे लक्ष वेधले असता रावत म्हणाले, अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा विविध पक्षाच्या गटाने आयोगाला वेळ मागितली नाही. मात्र, त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यास निश्चित वेळ देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल असा खुलासा त्यांनी केला आणि निवडणूक आयोग सर्वांसाठी खुले आहे असं प्रतिपादन सुद्धा त्यांनी केलं.
