नवी दिल्ली : देशभर अनेक महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावर रान उठले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आरक्षण, एनआरसी आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना अशा विविध प्रश्नांना जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आरक्षणाच्या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की,’जातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही’, त्यामुळे याबाबत कोणीही मनात शंका ठेऊ नये. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने हीच देशाची ताकद असून, सबका साथ, सबका विकास या आमच्या उद्देशानुसार आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी, दलित तसेच ओबीसी समाजाचे हित जपणे आमच्या सरकारसाठी गरजेचे आहे असं मत मोदी यांनी व्यक्त केलं.

तसेच एनआरसीच्या मुद्द्यावरुन कोणत्याही भारतीयाला आपला देश सोडावा लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत, परंतु त्या देशासाठी अत्यंत दुर्देवी आहेत. यामुद्यावरून कोणीही राजकारण करु नये, तसेच सर्वांनी मिळून राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. देशातील अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन कधीच होऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी त्यांची भुमिका एएनआय’च्या मुलाखतीत स्पष्ट केली आहे.

PM Modi ultimately talked on reservation issues in India during interview given to ANI