हैदराबाद : बांद्रा विधानसभेच्या पोटनिवडणुकी दरम्यान काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंना पराभूत करण्यासाठी आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी एमआयएम’ने महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, मागील काही वर्षांपासून शिवसेनेवर टीका करायला जराही वेळ नसलेले एमआयएम’चे अध्यक्ष ओवैसी यांनी शिवसेनेवर दसरा मेळाव्या नंतर पुन्हा टीका करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेवर टीका करताना ओवैसी म्हणाले की “शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरते. त्यामुळे त्यांनी स्वतःचा जनाधार टीकवण्यासाठी सामनाच्या अग्रलेखाचा आसरा घेऊन मोदींवर टीका करण्याची रणनीती स्वीकारली आहे. तसेच, जर शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहायचे थांबवून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान दिले आहे.
दरम्यान, भाजपवरील अनेक प्रश्नांना थेट उत्तर देताना टाळाटाळ करणाऱ्या शिवसेनेने आता ओवैसी यांच्या प्रत्येक उत्तराला प्रतिउत्तर न दिल्यास आश्चर्य वाटायला नको, असा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
Shiv Sena is scared of PM Modi & to cover up their cowardice they have devised this new theory of only writing editorials. My request to them is to stop writing editorials & leave the Modi & Fadnavis govt. I can prove to you that my ancestors are from India: Asaduddin Owaisi pic.twitter.com/7WUlGlbHQ7
— ANI (@ANI) October 20, 2018
