नवी दिल्ली : देशातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारला साडेचार वर्षे का लागली? असा प्रश्न शिवसेना खासदार आनंद अडसुळ यांनी उपस्थित करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात धनगड आणि धनगर असा शब्द बदलला तरी सुद्धा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही असं सुद्धा त्यांनी लोकसभेत विचारलं.

दरम्यान, मोदी सरकारने उचललेलं पाऊल चांगलं असल्याचा दाखल देत ‘साडेचार वर्षे का लागली’ असा अडचणीत आणणारा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात हे विधेयक अडचणीचं ठरू शकतं असं सुद्धा आनंद अडसुळ यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकसभेत बोलताना आनंद अडसूळ म्हणाले की, नोटाबंदीचा फटका छोट्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर बसला, अनेक लघू उद्योग बंद पडले. तसेच मोठा नोकरदार वर्ग बेरोजगार झाला. इतकंच नाही तर सगळा फटका बसलेला असताना त्यात जीएसटी सुद्धा लागू झाला. त्याचा सुद्धा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. मग आता या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तेव्हाच आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न त्यांनी थेट लोकसभेत मोदी सरकारला विचारला आणि त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

Shivsena mp anand adsul asked question during reservation discussion at loksabha