लखनौ : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यानंतर देशातील वातावरण तापून गेले. त्यात महिन्याभराने झालेल्या एअर स्ट्राईकनंतर सत्ताधारी भाजपने लष्कराच्या नावाने स्वतःचा प्रचार आटपून घेतला आणि स्वतःसाठी वातावरण निर्मिती करून घेतली.

परंतु, सत्ताधारी भाजपासाठी महत्वाचा असलेला उत्तर प्रदेश आणि हिंदी भाषिक पट्यात भाजप भ्रमात असल्याचं चित्र आहे. कारण उत्तर प्रदेशातील ज्या भागातून अनेक शहीद आणि विशेष करून सीआरपीएफ’च्या जवानांवरील नुकत्याच झालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आणि त्यांची कुटुंब ज्या भागातून येतात तेथेच ‘द वायर’च्या प्रतिनिधींनी सामान्य लोकांशी संवाद साधला आणि निवडणूकपूर्व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला.

सामान्य लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपच्या वाभाडे काढणाऱ्या आणि जवानांप्रती आत्मीयता दाखवणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने या विषयाला अनुसरून जे राजकारण केलं, त्यावरून येथील लोकं प्रचंड नाराज असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे भाजप जरी काही पेड प्रसार माध्यमांच्या आडून सत्ताधाऱ्यांबद्दल होकारात्मक परिस्थिती दाखवत असलं तरी जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं त्यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

VIDEO : काय आहेत त्या स्थानिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया?

The wire report from Uttar Pradesh over Pulawama attacked and loksabha election