मुंबई : मागील केवळ एका आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या ५ वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दांत एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकावर बोचरी टीका केली आहे. ट्विट करुन जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
जयंत पाटील म्हणतात, निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून घाईगडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार सुरु आहे. सरकारने आता आपला हा उद्योग थांबवावा. त्यांच्या सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णयही त्यांनी लक्षात ठेवावा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
गेल्या एका आठवड्याभराच्या कालावधीमध्ये @Dev_Fadnavis यांनी तब्बल १८० जी आर काढले ह्याचा एकच अर्थ निघतो गेल्या पाच वर्षात या भाजप सरकारने झोपा काढल्या. घाई गडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढणे या सरकारने आतातरी थांबवावे #DemonetisationYaadRakhna #2019LokSabhaElections
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 11, 2019
दरम्यान, भारतीय सैन्याचा राजकारणासाठी वापर करुन मतं मागणारे दोषीच आहेत, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षावर अद्यापही टीका सुरु असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली तरी त्यांच्यात अद्याप अनबन सुरुच असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
