त्रिपुरा : डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरा राज्यात आज विधानसभेसाठीच्या मतदानात ६५% मतदान झाले. विद्यमान माणिक सरकार आणि भाजप मध्ये थेट लढत आहे.
त्रिपुरा मध्ये कित्येक वर्ष माणिक सरकार चे राज्य असून भाजपने ही आक्रमक प्रचाराने उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रचाराचा धुरळा उडवत डाव्यांना हा विजय सहज नसल्याचे सूचित केले आहे.
उत्तर पूर्वेकडील एकूण ७ राज्यांपैकी त्रिपुराची पहिली निवडणूक पार पडत आहे. आज संध्याकाळ पर्यंत एकूण ६५% टक्के मतदानाची नोंदणी झाली असून हे विधानसभा निवडणूक कम्युनिस्ट पक्ष पुन्हा जिंकणार की भाजप सरकार स्थापन करणार ते तीन मार्चलाच कळू शकेल. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली नसून दोन्ही पक्ष स्वतंत्रपने निवडणूक लढवत आहेत. तिन्ही राज्यांचे म्हणजे मेघालय, नागालँड आणि त्रिपुराचे निकाल एकाच दिवशी म्हणजे ३ मार्चला जाहीर होणार आहेत.
त्रिपुरामध्ये एकूण २५ लाख ७९ हजार मतदार असून, एकूण ६० जागांसाठी होत असलेल्या जागांसाठी २९७ उमेदवार रिंगणात आहेत.
74% voter turnout till 4pm, it likely to go up as there are people in queues to vote even now: Election Commission #TripuraElection2018 pic.twitter.com/UWktStCOp7
— ANI (@ANI) February 18, 2018
