जळगाव : ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्हातील बोदवड इथं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोणशिला प्रसंगी खडसे बोलत होते.

ज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर लाठ्या – काठ्या खाल्या आणि राज्यात भाजपचा वटवृक्ष केला त्यांनाच आज उन्हात केलं आहे. जर माझ्यावरच्या आरोपांवर सरकारकडे सबळ पुरावे असतील तर त्यांनी ते जनतेसमोर ठेवावे असे ही ते उपस्थितांना संबोधताना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी ही एकनाथ खडसे यांनी अशीच खदखद व्यक्तं केली होती.

Ekanath Khadse Not Happy in BJP