आगामी महानगरपालिका निवडणुका | प्रभाग रचनेचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा?

मुंबई, २४ सप्टेंबर | राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुसाठी प्रभागरचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय समिकरणे बदलणार आहेत. हा निर्णय महाविकास आघाडीला फायदाचा ठरावा म्हणून घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुका | प्रभाग रचनेचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा? – Upcoming Municipal Corporation Elections 2022 in Maharashtra predictions :
महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी निर्णय?
भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चार सदस्यीय प्रभाग रचना करून त्यांनी अनेक महापालिकेवर आपला झेंडा फटकावला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्या निर्णयाला विरोध करत तो रद्द केला. आता बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा हा निर्णय झाला असून, मुंबई वगळून राज्यातील सर्वच आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सर्वच आगामी निवडणुका असणाऱ्या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी हा निर्णय घेतला असेल तर सगळीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे सुद्धा पाहावे लागणार आहे.
काँग्रेसने यापूर्वीच वेगळी निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. या प्रकारामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता भाजपकडून वर्तवली जात आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने घेतलेला प्रभाग रचनेच्या बदलाचा निर्णय एकत्रितपणे लढण्याचे संकेत आहेत. नगरविकास मंत्री शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. निर्णयामागे राजकीय उद्देश नाही, परंतु महाविकास आघाडी सरकारला सामावून घेण्याची संधी आहे, असे मत शिंदे यांनी मांडले.
पक्षीय राजकारणाला बळ:
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आता पक्षीय राजकारणाला बळ मिळणार आहे. ज्या पक्षाची संबंधित प्रभागात ताकद असेल शिवाय संबंधित उमेदवारसुद्धा चांगले काम करत असेल तर त्यालाच नागरिक संधी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारसुद्धा काही प्रमाणात अडचणीत आल्याचे दिसून येत असून, जे केवळ 500 ते 600 मतांच्या जीवावर उड्या मारतात त्यांनाही चांगलाच फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय आता प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारसरणी आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणालाही आता बळ मिळणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम काय?
मुंबई महापालिकेत एक प्रभाग एक सदस्य ही पद्धत याआधीही लागू होती. आणि यापुढेही लागू राहणार आहे. यामुळे याचा फायदा सत्ताधारी शिवसेनेला होईल अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका झाल्या. त्याठिकाणी एक प्रभागात तीन ते चार सदस्य असल्याने त्याचा फायदा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला झाला. भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्या. राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाला फायदा होईल अशी भीती होती. राज्य सरकारने मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून जाऊ नये, यासाठी मुंबईत एक प्रभाग एक सदस्य पद्धतीच ठेवली आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ही पद्धत कायम ठेवण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Upcoming Municipal Corporation Elections 2022 in Maharashtra predictions.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER