मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांनी उभ्या केलेल्या धावसंख्येवर आणि इतर फलंदाजांनी उभारलेल्या धावांवर भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.
भारताने बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४४३ धावांवर डाव घोषित केला हे. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने नाबाद ६३ धावांची अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीकडे लक्ष लागून राहिले आहे.
