चेन्नई, १६ फेब्रुवारी: टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.

त्याशिवाय दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना अश्विन यानं शतकी खेळी केली होती. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं दुसऱ्या डावांत अचूक टप्यावर मारा करत पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत दोन आणि दुसऱ्या डावांत पाच बळी घेत सामन्यात सात बळी मिळवले आहेत. कुलदीप यादव याला दोन बळीवर समाधान मानवं लागलं. ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यानं पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांत विराट कोहलीनं महत्वाची अर्धशतकी खेळी केली.

 

News English Summary: Team India beat England by 317 runs in the second Test. India had challenged England for a 482-run victory. However, England were bowled out for 164 in the second innings by India. Moil Ali top-scored for England with 43 in the second innings. Akshar Patel took the most 5 wickets from Team India. Local boy R Ashwin took 3 wickets and Kuldeep Yadav took 2 wickets. With this victory, Team India has tied the four-match series 1-1.

News English Title: Team India beat England by 317 runs in the second Test news updates.

IND vs ENG | भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय