कल्याण: देशभर आमदार आणि खासदार असे महत्वाचे लोकप्रतिनिधी नकोत्या विषयात गुंतलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं आहे त्यासाठी ते पूर्णत्वाला घेऊन जाण्यात गुंतले आहेत. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच ते विकास कामांचा मोगोवा घेत होते.
त्यासाठी त्यांनी कल्याण-डोंबिवली मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विकास कामांना हात घातला आहे आणि तडीस घेऊन जाण्यास प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ करताना दिसत आहेत. त्यासाठी कल्याण डोंबिवलीतील मनसेची संपूर्ण टीम त्यांच्यासोबत पाठपुरावा करताना दिसत आहे. आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा घेतलेल्या अजून एका महत्वाच्या कामाला प्रशासन पातळीवर गती मिळाली आहे.
कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. सदर पूल महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्टसिटीचे अधिकारी आणि रेल्वेप्रशासन यांची आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. कारण या पुलाच्या उभारणीसाठी एकूण ३८ कोटी ५७ लाख निधी मजूर करण्यात आल्याने स्थानिक लोकांची मोठी मागणी पूर्णत्वाला येणार आहे.
गेले अनेक दिवसांपासून रखडलेला लोकग्राम रेल्वे पादचारी पुल (स्कायवाॅक) लवकरच चालू होणार. ३८ कोटी ५७ लाख निधी मंजूर.#lokgram #skywalk #kdmc pic.twitter.com/xmRmO9ZfJ0
— Raju Patil (@rajupatilmanase) December 31, 2019
Web Title: MNS Kalyan Gramin MLA Raju Patil request is accepted on Lokgram Bridge construction.
