15 February 2025 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी, रु.18000 सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात 1,30,35,058 रुपये जमा होणार Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल Horoscope Today | शनिवार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य, मेष आणि तुळ सह या राशींसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या
x

फरहान आझमी म्हणतो..तर आम्ही बाबरी मस्जिद बनवू...हे सेनेला पटणार का? सोमैया

CM Uddhav Thackeray, BJP Former MP Kirit Somaiya, Ram Mandir, Babri Masjid

नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, ‘कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा’. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भारतीय जनता पक्ष असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवू शकतो.

यावेळी माजी खासदार सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. एकीकडे संजय राऊत घोषणा करतात की उद्धव ठाकरे 7 मार्चेला राम मंदिरात जाणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याचसोबत सत्तेत असलेला त्यांचा जोडीदार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा म्हणतो की, उद्धव ठाकरे रामंदिरात जाणार असेल तर आम्ही सुद्धा बाबरी मस्जिद बनवू. त्यामुळे हे शिवसेनेला पटणार आहे का ? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंना रात्र-दिवस फक्त कमळचं दिसत आहे. तर आम्हाला तुमचं सरकार पाडण्यासाठी कोणत्याच ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. कारण तुमचा एक पाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ओढत आहे, तर दुसरा पाय राहुल गांधी ओढतायत. जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेवर केली आहे.

 

Web Title: Story BJP Former MP Kirit Somaiya criticized CM Uddhav Thackeray over Ram Mandir and Farhan Azami Statement over Babri Masjid.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x