अयोध्या : २५ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अयोध्येत सभा आणि दुसरीकडे त्याच दिवशी आरएसएस’ने सुद्धा सभा आयोजित करण्याच्या घोषणा केल्या आहेत. ६ डिसेंबर १९९२च्या त्या घटनेतील हिंदू आणि मुस्लिम समाजातील पीडितांच्या जखमा आजही ताज्या असताना केवळ आगामी निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक फायदा करून घेण्यासाठी सत्ताधारी पुढे सरसावले आहेत. दरम्यान, २५ नोव्हेंबरच्या पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे स्थानिकांनी पुन्हा भीती व्यक्त केली आहे.

अयोध्येतील मुस्लीम जनतेत पुन्हा भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. या दिवशी तेथे पुन्हा जनसमुदाय जमून काही अघटित घडण्याची भीती स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. राजकीय पक्ष येथे जनसमुदाय जमवून काही प्रक्षोभक वक्तव्य करतील आणि पुन्हा तीच जुनी परिस्थिती उभी राहील अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी जेव्हा बाबरी पाडली गेली, तेव्हा स्थानिक मुस्लिम लोकांच्या घरांची मोठ्याप्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती, अशी आठवण रामजन्मभूमी वादातील याचिकाकर्ते इकबाल अन्सारी यांनी प्रसार माध्यमांना करून दिली आहे.

येथे मोठा जनसमुदाय जमल्यास होणारे नुकसान कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे त्याआधीच आमच्याकडे गाव सोडून जाण्यापलीकडे पर्याय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राजकारणी लोकं केवळ निवडणुकीच्या कारणाने पुन्हा देशातील वातावरण बिघडविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ayodhya babri masjid litigant iqbal ansari says muslims of ayodhya has fear ahead of rss and shivsena rally