3 May 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

खोटे बोलण्यात ते पटाईत; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात

शिर्डी : काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. माझ्या रक्तातच लाचारी नाही आणि मी सत्तालोलूप सुद्धा नाही, पण तुम्ही तर चक्क खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा औढा देशद्रोहच आहे, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर प्रहार केले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्या पाठोपाठ रविवारी शिर्डीत येऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील दसरा मेळाव्यात मोदींवर करण उद्धव ठाकरे यांनी टाळलं असताना कालच्या भाषणात मात्र त्यांनी मोदींनाच लक्ष्य केलं होते. तसेच भाषादरम्यान टायटीनी ‘कसं काय पाहुणं बरं हाय का’ हे गाणे म्हणत त्यांनी मोदींच्या मराठी भाषेतील सुरुवातीची खिल्ली सुद्धा उडवली.

५ वर्षे सत्ता घेऊन तुम्ही असे काय दिवे लावले? असा सवाल साईबाबांनी त्यांना केला असेल असं म्हणत त्यांनी मोदींच्या प्रार्थनेची खिल्ली उडवली. खोटे बोलण्यात मोदी पटाईत आहेत. आता २०२२ पर्यंत सगळ्यांना घरे देणार, असे सांगून शिर्डीत येऊन फक्त चावी मारून गेले,’ असा सणसणीत टोला सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदींच नाव न घेता लगावला. शिवसेना सत्तेतून का बाहेर पडत नाही, असा सवाल करणाऱ्यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले. ‘आम्ही सत्तेतून कधी सुद्धा बाहेर पडू शकतो, पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घेता येत असेल तर का बाहेर पडायचे? शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाला भाव, पाणी देत असाल, तर ५०० वर्षे सत्ता देऊ, पण तुम्ही केवळ खोटे बोलून सत्ता मिळविता़, असा हल्लाबोल त्यांनी पंतप्रधानांवर केला आहे.

दरम्यान, कालच्या सभेत भाजपची राजकीय कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून आला. कारण राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम ही सगळी तुमची जुमलेबाजी आहे का, असा सवाल करत ‘मंदिर नही बनायेंगे’ असे एकदा देशवासियांना सांगून टाका़, मग आम्ही काय करायचे ते करतो़, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x