ग्रामपंचायत निवडणुकीत ती मतं एकनाथ शिंदे या चेहऱ्याला नव्हे | तर मतदारांच्या पारंपारीक धनुष्यबाण चिन्हाला व स्थानिक उमेदवाराला
CM Eknath Shinde | २१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेला बंडाळी होणं हे काही नवं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वार्थाने वेगळं ठरलं कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यातील मोजक्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत.
भाजप – 80 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय
राष्ट्रवादी काँग्रेस – 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय
शिंदे गट – 40 ग्रामपंचायत ताब्यात
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 27 ग्रामपंचायतींवर विजय
काँग्रेस – 22 ग्रामपंचायत ताब्यात
शिंदे मुख्यमंत्री होऊनही भाजपनंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष :
शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊनही आपण निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेल्याचा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. तसेच राष्ट्रवादी वाढत असल्याचा दुहेरी आरोप सुद्धा त्यांनी केला होता. मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आणि जवळपास ७० टक्के शिवसेना (आमदार, खासदार, पदाधिकारी) आपल्याकडे खेचल्यानंतरही मूळ शिवसेना (उद्धव ठाकरे) चौथ्या क्रमांकावरच आहे आणि राष्ट्रवादी पक्ष द्वितीय म्हणजे शिंदे गटाच्या वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिंदे यांच्या फुटीर गटामुळे शिवसेनेच्या एकूण जागा ५७ (शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मिळून) झाल्या असत्या आणि पक्ष द्वितीय क्रमांकावर गेला असता असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. तसेच शिवसेनेतील फुटीने राष्ट्रवादीला काहीच फरक पडला नसला तरी (शिंदेंच्या आरोपाच्या उलट) भाजपाला मात्र या वादाचा फायदा झाल्याचं स्पष्ट होतंय.
धनुष्यबाणाशिवाय लढल्यास ०४ जागांची खात्री देणं अवघड होईल :
एकनाथ शिंदे यांना सुद्धा धनुष्यबाण या चिन्हाचं महत्व पहिल्यापासून माहिती असल्याने ते बंड केल्यापासून आम्हीच खरी शिवसेना या दाव्याला खिळून राहिले आहेत. एकनाथ शिंदे हे राज्यातील जनतेचा राजकीय दृष्ट्या आकर्षित करणारा चेहरा नव्हे हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांना राजकारणात टिकून राहायचे असल्यास धनुष्यबाण चिन्हं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच ते स्वतःचा गट म्हणजेच खरी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते ‘गट’ म्हणून भासवत आहेत. त्यांच्या आजच्या ट्विटमध्ये त्यांनी तो प्रयत्न केला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्हं आणि स्थानिक उमेदवाराला मतदान होतं :
ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही उमेदवार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर आणि स्थानिक उमेदवार कोण आहे यावर मतदान होतं. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना याच 4 प्रमुख पक्षांची चिन्हं ही पारंपरिक मतदारांच्या नजरेसमोर असतात. मात्र जेथे अपक्ष निवडून येतो तेथे उमेदवार महत्वाचा ठरतो आणि त्यामुळेच या ग्रामपंचायत निवडणुकीत ४७ अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारांनी ते मतदान शिंदेंना नव्हे तर धनुष्यबाण या चिन्हाला आणि स्थानिक उमेदवाराला पाहून केलं आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या ‘पक्ष बाजूला ठेवून विचार केल्यास ते लोकशाहीला घातक ठरेल’ या विधानानंतर शिंदेंना प्रचंड थकवा जाणवू लागला होता असं म्हटलं जातंय.
एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत :
एकनाथ शिंदे यांची शिवसेना ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे असंच दिसतं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेतले १२ खासदारही शिंदे गटासोबत आले आहेत. तसंच कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे इथल्या माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आता तर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश मिळालं त्याबाबत उमेदवारांचं अभिनंदन करत असताना उद्धव ठाकरेंचा गट असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मूळ कारण वेगळं असताना ते बरोबर संधीचा फायदा घेत आपल्याला मतदारांनी स्वीकारल्याचा राजकीय आव आणत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra Gram Panchayat Election 2022 check details 06 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?