18 May 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

आरोग्य मंत्री म्हणतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी | टाटा इन्स्टिट्युट म्हणतं लाट येणार

Slight possibility, Corona wave, Health Minister Rajesh Tope, Tata Institute

मुंबई, २ नोव्हेंबर: गेल्या महिन्यात अगदी शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा उचल घेत असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी मृत्यू दर मात्रं कमी होताना दिसत आहे. मृत्यू दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं म्हटलं गेलं.

परंतु, पावसाळ्यात कोरोना मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढेल असं म्हटलं गेलं. त्यानंतर हिवाळ्याचे संकेत येताच पुन्हा तसेच निष्कर्ष वर्तविण्यात येतं आहेत. परिणामी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेची पूर्ण तयारी झालेली आहे असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या बाजूला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं टाटा इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी म्हटल्याचे वृत्त आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)च्या तज्ज्ञांनी यासाठी दिवाळीनंतरचा काळ महाराष्ट्रात अत्यंत धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

 

News English Summary: Though there is a possibility of a second wave, the Maharashtra government’s health system is fully prepared to deal with the situation, said Rajesh Tope. On the other hand, experts from the Tata Institute have reported that another wave of corona will hit Mumbai, the country’s financial capital. Experts from the Tata Institute of Fundamental Research (TIFR) have concluded that the post-Diwali period is extremely dangerous in Maharashtra.

News English Title: There is slight possibility of second corona wave in Maharashtra says Health Minister Rajesh Tope News Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x