2 May 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

विधानसभेत 'त्या' १५३ जागांवर मनसेला मोठी सुवर्णसंधी: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, Raj Thackeray, MNS, Maharashtra Assembly Election 2019

अकोला : आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.

त्यानुसार शिवसेना १३५ आणि भाजपाचे मित्र पक्ष १५३ जागांवर लढणार आहेत. लोकसभा निवडणुकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना ‘कोमा’त आहे. शिवसेना आणि मनसे यांना मतदान करणाऱ्यांची मानसिकता सारखी असल्यामुळे ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना पुनरागमनाची सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. १५३ विधानसभा मतदारसंघांत मनसेच्या चांगली कामगिरी करू शकते, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा सर्वच विरोधी पक्षाकडून सुरु आहे. त्यात अनेकांनी आपला पराभव नेमका कशामुळे झाला त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर चिंतन केल्यावर प्रकाश अमीबेडकर म्हणाले की, दलित आणि मुस्लिम हे समीकरण जसे औरंगाबादमध्ये जमून आले, तसे इतरत्र जमून आले नाही, इतर ठिकाणी मुस्लिम मते न मिळाल्यानेच वंचित बहुजन आघाडीचा मोठा पराभव झाला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आज अकोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. दलित आणि मुस्लिम यांनी एकगठ्ठा मतदान केल्यामुळे औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. परंतु इतर ठिकाणी असे झाले नाही. मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली नाहीत, म्हणून आघाडी हरली, असे आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x