नवी दिल्ली : आज २-जी घोटाळा प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या मध्ये ए राजा आणि कनिमोळी या दोघा मोठ्या राजकारण्याचाही समावेश होता. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असल्याने काँग्रेसने ही तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, या निकालातून भाजप ने केलेला अपप्रचार आणि दृष्ट हेतूने उचलेला मुद्दा हा केवळ पीए-2 च्या खोट्या बदनामीसाठीच उचलून धरला होता हे या निकालातून स्पष्ट झालं असल्याचे पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.

देशाला १ लाख ७६ हजार कोटींचा फटका देणाऱ्या ‘२जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्या प्रकरणी आलेल्या निकालात सीबीआय विशेष कोर्टाने ए राजा आणि कनिमोळी सहित सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

सीबीआय विशेष कोर्टाच्या या निकालानंतर भाजप सरकार मात्र तोंडघशी पडलं असून काँग्रेस चा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

2G Scam Verdict the Massive Propaganda against UPA was without any foundation says Manmohan Singh