29 April 2024 12:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

देशात मागील ५ वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी': ममता बॅनर्जी

Narendra Modi, Amit Shah, mamta banarjee

नवी दिल्ली : भारतात ४४ वर्षापूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आजच्या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली होती, परंतु देहात मागील ५ वर्षात सूपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. आपल्याला इतिहासाकडून खूप काही शिकणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या संस्थांनांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी सा्ंगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रचंड तणाव वाढलेला आहे. ममता बॅनर्जी यांनी उघडपणे आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ममता बॅनर्जी यांनी गैरहजेरी लावली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दररोज हिंसक घटना घडत असून कोणाचा ना कोणाचा जीव देखील जात आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन निर्दयीपणे हिंसा करत एकमेकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे.

त्यामुळे देशातील आणीबाणीला ४४ वर्ष उलटली असली तरी आज मोदी आणि अमित शहांच्या राजवटीत खरी आणीबाणी आहे आणि ती मागील ५ वर्षांपासून देशात आहे अशी खरमरीत टीका सध्या विरोधक करताना पाहायला मिळत आहे.

या संदर्भात काय म्हणाल्या आहेत ममता बॅनर्जी नेमकं?

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x