मुंबई: महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम व सत्ता वाटप यावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
काल सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू होत्या. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला घाई नसल्याचे म्हटले होते. कालच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, नवाब मलिक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण व विजय वडेट्टीवार हे नेते होते.
#WATCH NCP leaders Jayant Patil, Ajit Pawar, Chhagan Bhujbal,Dhananjay Munde&Nawab Malik and Congress leaders Balasaheb Thorat,Prithaviraj Chavan,Sushil Kumar Shinde, Ashok Chavan,Manikrao Thakre,Vijay Wadettiwar hold meeting to discuss the Common Minimum Programme #Maharashtra. pic.twitter.com/XOX3VjEpRQ
— ANI (@ANI) November 13, 2019
