6 May 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक: सदाभाऊ खोत

Sadabhau Khot, Farmers Loan Waiver

मुंबई : “महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे”, असा घणाघात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. याच गोष्टीचा धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीवर टीका केली.

जाहिरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ. तुम्ही शेतीच्या जोडधंद्याला जे कर्ज घ्याल त्याला आम्ही माफी देणार नाही, असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं असतं तर लोकांनी देखील आधी ठरवलं असतं की कोणाच्या बाजूने जायचं, असं खोत म्हणाले. दरम्यान, मी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे की जे पक्ष जाहिरनाम्यात छापतात आणि निवडून आल्यावर त्याची आंमलबजावणी करत नाही अशा पक्षांची नोंदणाी रद्द केली पाहिजे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तब्बल ७ लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड’मधील बैठकीत दिले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी ओरिएंटल व बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे २०१८ चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर ९० हजार नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत २७ तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले.

 

Web Title:  Rayat Party Chief Sadabhau Khot said Maharashtra government cheats farmers.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x