नवी दिल्ली: नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष यांनी लिहिलेलं ‘बॅकस्टेज : द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाई ग्रोथ ईअर्स’ हे पुस्तक रविवारी प्रकाशित झालं. या पुस्तकात युपीए सरकारच्या काळातील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयीच्या घटनेबद्दल अहलुवालिया यांनी लिहिलं आहे.
मोंटेक सिंह अहलुवालिया यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या २०१३मध्ये अध्यादेश फाडण्यासंबंधीच्या घटनाक्रमानंतर तत्कालीन पंतप्रधानांनी माझ्याकडे विचारणा केली होती की मी राजीनामा देऊ का?, असा गौप्यस्फोट अहलुवालियांनी केला आहे.
अहलुवालिया यांनी काय सांगितलं?
“मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांसोबत गेलेल्या शिष्टमंडळात होतो. त्यावेळी माझा भाऊ जो आयएएस पदावरून निवृत्त झाला आहे. त्याने मला सांगितलं की, ‘एक लेख लिहिला आहे जो पंतप्रधानांसाठी महत्त्वाचा आहे.’ त्याने तो लेख मेल केला. त्याचबरोबर ‘हा लेख वाईट तर नाही ना?’ अशी विचारणाही केली. हा लेख घेऊन मी पंतप्रधानांकडे (मनमोहन सिगं) गेलो. त्यांनी सगळ्यात आधी माझं ऐकावं अशी माझी इच्छा होती. त्यांनी तो लेख शांततेनं वाचला, पण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर अचानक मनमोहन सिंग यांनी विचारलं की, मी राजीनामा द्यायला हवा का?, अशी विचारणा केली. त्यावर या मुद्यावर राजीनामा देणं उपयोगी नाही, असं मी त्यांना सांगितलं,” असं अहलुवालिया यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
Web Title: Story Former PM of India Manmohan Singh had think about resignation says Montek Singh Ahluwalia.
