24 May 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु Suzlon Share Price | ब्रेकआऊटचे संकेत? सुझलॉन स्टॉक तेजीत धावणार, नवीन अपडेटनंतर शेअर मोठा परतावा देणार Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट जाणून घ्या
x

केंद्राकडून फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकांना लाभ नाही; भाजपच्या आरोपातील हवाच गेली

Covid19, Corona Crisis, CM uddhav Thackeray

मुंबई, ०८ एप्रिल: राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगूनही राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपातील हवा निघून गेली आहे.

तसेच ‘केंद्रांची योजना अन्नसुरक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे. सर्वांची सामुहिक जबाबदारी, केंद्र आणि राज्य दोघेही काम करत आहेत. साडेपाच ते सहा लाख लोकांना सरकार रोज जेवण पुरवत आहे. केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देणार,’ अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

News English Summary: Meanwhile, the central government’s plan includes only rice allocation. Chief Minister Uddhav Thackeray said that the state government is giving away three kilograms of wheat at Rs 8 per kg and rice at Rs 12 per kg. Given. So, despite the central government asking for free allotment of food grains, the allegations against BJP that the state government is not distributing food grains are gone.

News English Title: Story Chief Minister Uddhav Thackeray reaction on central governments free rice distribution scheme Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x