नवी दिल्ली, २५ एप्रिल: देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

दुसरीकडे, देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने काही अटींवर अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी दिली आहे. महिनाभराच्या लॉकडाऊननंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी भागाला वगळण्यात आले आहे.

 

News English Summary: The number of corona cases in the country has been on the rise since March, with 775 people dying from the corona virus in the country so far, according to the health ministry. At the conference held on Friday, India’s recovery rate was 20.57 per cent, said Love Agarwal, Joint Secretary, Ministry of Health.

News English Title: Story India cases cross 24000 mark death toll touches 775 Covid 19 News Latest Updates.

देशात ५०६३ रुग्ण ठणठणीत बरे; पण कोरोनाग्रस्तांची संख्या २४,५०६ वर