29 April 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शिवसेनेची टीका, अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत 'गाजर' हलवा झाला

मुंबई : सामना अग्रलेखातून शिवसेनेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणावर सडकून टीका केली आहे. सामना अग्रलेखात म्हटले आहे की, अण्णांनी रामलीला मैदानावरील त्यांचे आंदोलन मागे घेतले असले तरी त्यातून साध्य काय झालं असा प्रश्न उपस्थित केला आहे. पूर्वीसारखा जोर त्यांच्या आंदोलनात आता दिसलाच नाही अशी बोचरी टीका अण्णांच्या आंदोलनावर करण्यात आली आहे.

अण्णांनी लोकपाल तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले खरे पण अण्णांच्या आंदोलनातून नक्की साध्य काय झालं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सातव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले म्हणजे नक्की काय झालं ? फडणवीसांनी अण्णांच्या विविध मागण्यांच पंतप्रधानांची सही असलेलं पत्र अण्णांना सुपूर्द केलं आणि अण्णांनी आंदोलनाची सांगता केली आणि बातमी आली की, केंद्र सरकारने सर्व मागण्या तत्वतः मान्य केल्या. आता तत्वतः म्हणजे नक्की काय ? पुन्हा अण्णा म्हणतात मागण्या सहा महिन्यात मान्य नाही झाल्या तर पुन्हां उपोषणाला बसेन. मुळात अण्णांच्या रामलीला मैदानावरील फलित काय ? तर फक्त अण्णांचं वजन सहा-सात किलोने घटले, पण आंदोलनातून काहीच हाती लागले नाही.

सरकारच्या तत्वतः आश्वासनांवर भरवसा ठेवायचा होता तर रामलीलावर कशाला, सरळ राळेगणसिद्धीतच आंदोलन करायला काहीच हरकत नव्हती. अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते अशी बोचरी टीका अण्णांच्या आंदोलनावर सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x