मुंबई, २१ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा फटका राज्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून पुढचे काही दिवस महाराष्ट्राला पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कारण, राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील या जिल्ह्यांव्यतिरिक्त ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदूरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

News English Summary: The return rains in the last few days have hit some districts in the state. The return rains have caused huge losses to farmers. Maharashtra will have to bear the brunt of rains for the next few days. Some districts in the state, including Raigad, Ratnagiri and Sindhudurg, are likely to receive showers with thunderstorms and lightning in the next three to four hours.

News English Title: Heavy Rains Expected In Raigad Ratnagiri Sindhudurg Districts In Next Three Hours Says IMD News Updates.

येत्या ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता – IMD