30 April 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
x

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, wrote a letter, CM Uddhav Thackeray, Farmers issue

मुंबई, ०५, नोव्हेंबर: राज्यातील शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अजून पोहोचलेलं नाही. परिणामी बळीराजा हवालदिल झाल्याचं ग्रामीण भागातील सध्या चित्र आहे. परतीच्या पावसात अतिवृष्टी-बोंडअळीच्या रोगामुळे कापूस-सोयाबीनचं झालेलं प्रचंड नुकसान, जे बाधित शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत तसेच शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला उशीर यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

संबंधित पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. आताच्या अंदाजानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते अजून वाढत जाणार आहे. साधारणत: एकरी सहा क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी एक क्विंटल आणि फार कमी ठिकाणी दोन क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ ८० टक्क्यांच्या जवळपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.”

 

News English Summary: The package announced by the state government has not yet reached the farmers in the state. As a result, there is a picture in the rural areas that farmers has become distraught. Leader of Opposition Devendra Fadnavis has lashed out at the Mahavikas Aghadi government over the huge loss of cotton and soybean due to heavy rains and bollworm in the rains, which has not yet helped the affected farmers.

News English Title: Devendra Fadnavis wrote a letter to CM Uddhav Thackeray over farmers issue News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x