नागपूर : शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर भाजपसोबत युती केली नाही तर शिवसेना पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडतील असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. या विधानाने शिवसेना आणि रामदास आठवले यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने आगामी निवडणुकीत भाजप यावे अशी सर्वांचे प्रयत्नं आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याची शक्यता सुद्धा आठवलेंनी बोलून दाखविली आहे.
परंतु युतीसाठी सर्व प्रयत्नं करून सुद्धा शिवसेनेने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास उलट शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडण्याची शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एकूणच आमदार आणि खासदार बाहेर पडल्याने शिवसेना पक्षात उभी फूट पडेल असं ते म्हणाले.
