5 May 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं | सतत टोचल्याशिवाय पुढेच जात नाही - गडकरी

Union Minister Nitin Gadkari, MahaVikas Aghadi government

नागपूर, ३० नोव्हेंबर: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. तसं केल्याशिवाय ते पुढेच सरकत नाही, असं टीकास्त्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सोडलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी (BJP Nagpur Graduate constituency candidate Sudhir Joshi) यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात नितीन गडकरी संबोधित करत होते.

पुढे गडकरी म्हणाले की, निवडणुकीत जातीपातीचं राडकारण व्हायला नको, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं. ‘कोणताही माणूस जातीनं मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. निरनिराळ्या राजकीय पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, त्यांना जात आठवते. मात्र राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचं राजकारण करत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा,’ असं गडकरी म्हणाले.

दुसरीकडे फडणवीसांनी (Opposition Leader Devendra Fadnavis) देखील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील बळीराजाला दिलेले आश्वासन लक्षात नाही. परंतु मुख्यमंत्रिपदाचे वचन त्यांच्या बरोबर ध्यानात आहे. महाविकास आघाडी सरकार आहे की तमाशा? ओबीसी विद्यार्थ्यांना जगात चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता यावे म्हणून योजना आणली, परंतु हे महाविकास आघाडी सरकार काय करतेय तेच समजत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात, असेही फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: The Maha Vikas Aghadi government in Maharashtra is like a bull. This government has to keep on pushing. Without doing so, it will not move forward, said Union Minister for Land Transport Nitin Gadkari. Nitin Gadkari was addressing a graduation rally organized for the campaign of Sandeep Joshi, the official candidate of Bharatiya Janata Party from Nagpur graduate constituency.

News English Title: Union Minister Nitin Gadkari criticized MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x