27 July 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

ग्रामीण महाराष्ट्रात तीव्र 'पाणी-बानी'

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रात २६,३४१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्चपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रोजच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय तीव्र होऊ लागली आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातील ४३,६६५ गावांपैकी २६,३४१ खेडी आणि १२,९५६ वस्त्या-वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचार्ई आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ‘पाणी – बानी’ सारखी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. घशाची कोरड वाढू लागण्याने ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हैराण होण्याची चिन्हं आहेत.

राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून त्या पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५७३.१३ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. हा निधी २६,३४१ खेडी आणि १२,९५६ वाड्यांसाठी खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, नवे बोअर घेणे, बोअरची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे खासगी विहिरी अशा विषयांचा समावेश आहे.

पीडब्ल्यूएस म्हणजे नळपाणी पुरवठा योजनांवर लक्ष देण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत. आर्सेनिक आणि फ्लोराइड प्रभावित भागांना यात प्राधान्य देण्यात यावे, तसेच अर्धवट राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x