6 May 2024 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

शिवसेना वगळता सर्वच विरोधकांनी भाजपला धूळ चारली

मुंबई : देशभरात पार पडलेल्या मतं मोजणीतून जे निकाल हाती आले आहेत, त्यामध्ये शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी भाजपला पोटनिवडणुकीत मात दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत राहून भाजपला केलेला विरोध आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याच पंगतीला जाऊन बसण्याची रणनीती मतदाराच्या पचनी पडत नसल्याने, पुढील निवडणूका शिवसेनेला कठीण जाऊ शकतात.

२०१४ पासून शिवसेना सत्तेत राहून भाजपला विरोध करत आहे. केंद्र आणि राज्यात १२ -१३ मंत्रिपद उपभोगून शिवसेना विकासाच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत, पण त्यांचे मंत्री कोणता विकास करत आहेत याची उत्तर शिवसेनेकडे नाहीत. त्यामुळे शिवसेनेचा सत्तेत राहून विकासशुन्य कारभार सामान्य मतदाराच्या मनाला पटताना दिसत नाही.

त्यामुळेच भाजप बरोबर नसणारे सर्व पक्ष भाजप विरोधात यशस्वी होत आहेत, तर महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना पराभूत होत आहे. भाजपने संपूर्ण ताकद पालघरमध्ये पणाला लावली असली तरी, शिवसेनेतसुद्धा पक्ष नैतृत्वापासून संपूर्ण पक्ष पालघरच्या मैदानात उतरला होता. सर्व रणनीती वापरून सुद्धा अखेर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीला जर काँग्रेसचा पाठिंबा मिळाला असता तर कदाचित शिवसेना थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली असती.

नितीशकुमारांना जशी बिहारमध्ये भाजपशी जवळीक भोवताना दिसत आहे, तसेच शिवसेना जरी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा करत असेल, तरी एकूणच २०१४ पासूनच त्यांचं राजकारण पाहिल्यास मतदार त्यांच्यावर २०१९ मध्ये किती विश्वास ठेवेल हे आता सांगणं कठीण आहे. पण हिंदुत्वाच्या नावाने मतांसाठी उत्तर भारतीय मतदारांकडे आकर्षित झालेल्या शिवसेनेकडे, जर त्यांच्या पारंपरिक मराठी मतदाराने सुद्धा पाठ फिरवली तर आगामी निवडणुका शिवसेनेसाठी फारच कठीण जाऊ शकतात. आधीच शिवसेनेचा पारंपरिक कोकणी मतदार सुद्धा नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून आणि शिवसेनेच्या दुपट्टी भूमिकेमुळे रागावला आहे हे लक्षात घ्यायला हवे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x