29 April 2024 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शेतकऱ्यांना लाल किल्यावर जाऊ दिलं | गृहमंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? - राहुल गांधी

Congress, Rahul Gandhi, Modi government, Farmers issue

नवी दिल्ली, २९ जानेवारी: तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आहेत. प्रजासत्ताक दिवशी आयटीओ, लाल किल्ला आणि नांगलोई या भागात हिंसा झाली. आजही गाजीपूर आणि सिंघु बॉर्डरवर तणावाची स्थिती आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, तीनही कायदे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, तीनही कायदे कशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवतील.

नवीन कृषी कायदे रद्द करा आणि कचऱ्याच्या टोपलीत टाका. आता हा एकच पर्याय उरला आहे. नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहेत. शेतकऱ्यांना होणारी मारहाण ही दुर्दैवी आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना मारहाण करून देश कमकुवत करत आहे. या फायदा देशविरोधी शक्तींना होईल, असा घणाघात राहुल गांधी यांनी केलाय.

प्रजासत्ताक दिनाच्या वेळी झालेल्या या हिंसाचाराबाबत राहुल गांधी म्हणाले की, 50 शेतकऱ्यांना लाल किल्याच्या आत जाऊ दिलं. हे रोखणं गृहमंत्रालयाचं काम नव्हतं. गृह मंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? पंतप्रधान पाच व्यावसायिकांसाठी काम करतात. त्यांच्यासाठी नोटाबंदी आणण्यात आली, जीएसटी त्यांच्यासाठी आणि कृषी कायदादेखील त्यांच्यासाठी आणण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मागे हटण्याची गरजनाही. आम्ही त्यांना सहकार्य करू. हे आंदोलन ऐवढ्यात थांबणार नाही, हे शहरांमधून गावांपर्यंत पोहोचेल.

 

News English Summary: Farmers are on the streets against three agricultural laws. Violence erupted in ITO, Red Fort and Nangloi areas on Republic Day. Even today, there is tension on the Ghazipur and Singhu borders. Former Congress president Rahul Gandhi held a press conference on the whole issue. In it, he said, all three laws need to be understood. He made it clear how all three laws would harm farmers.

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticised Modi government over farmers issue news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x