30 April 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

सेनेच्या डझनभर मंत्र्यांची सत्तेत कामगिरी तरी काय? आता पुन्हां एकहाती सत्ता?

मुंबई : सध्या भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेली शिवसेना आणि त्यांच्या डझनभर मंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीतील खात्यांमार्फत राज्यातील जनतेसाठी कोणती विकासाची कामं केली ते माहित नसल्याने शिवसेना हळुवार पणे भावनिक मुद्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन असल्याने, मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु मिळालेल्या सत्तेचा महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणता उपयोग केला याबद्दल त्यांनी कोणताही शब्द काढला नाही.

आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही तसेच शिवसेना संपूर्ण देशभर पोहचवायची आहे असं उपस्थितीतांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले. आधी ८० टक्क्यावर असलेलं शिवसेनेचं समाजकारण हे आदित्य ठाकरेंनी थेट १५० टक्क्यांवर गेलं असल्याचा दावा केला. परंतु सत्तेतील सहभागी शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी मागील ४ वर्षात किती टक्के विकासाची तसेच पायाभूत सुविधांची कामं राज्यातील जनतेसाठी केली याचा कोणताही आकडा त्यांनी सादर केला नाही.

मुळात पक्षाने आयोजित केलेली रक्तदान शिबीर किव्हा इतर उपक्रम हे वेगळे विषय असतात. परंतु आपल्या राज्यातील व केंद्रातील १२-१३ मंत्र्यांनी प्रशासनातून महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणत्या राज्यस्तरीय पायाभूत सुविधा उभारून जनसेवा केली याचा कोणताही आकडा पक्षाकडे नसावा, त्यामुळे सध्या भावनिक मुद्याकडे लक्ष वळविण्याचे कार्यक्रम सुरु असल्याचं एकूणच चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x