मुंबई : आधीच नाणार प्रश्नी अडचणीत असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या स्थळी जाऊन नाणार’संबंधित अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला असा थेट सवाल पत्रकार परिषदेत केला आहे.
कोकणातील राजापूर मधील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्या संबंधित करारावर काही दिवसांपूर्वी दिल्लीत स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीने पुन्हा शिवसेनेला लक्ष केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी थेट पत्रकार परिषदेत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना प्रश्न केले आहेत.
शिवसेनेने म्हणजे उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी नाणार’च्या प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन भर सभेत अध्यादेश रद्द करण्याची घोषणा केली होती, मग करार झालाच कसा असा सवाल केला आहे. या प्रकल्पामध्ये गुजरातच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचे कागदोपत्री आरोप आधीच करण्यात आले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष शिवसेनेला अडचणीत आणत आहेत.
